Wednesday, March 26, 2014

किनारा

नावाड्या - तू रोज जातोस ह्या तीरावरून त्या तीरी,
सांग मला - पैलतीरावर वेगळं असं आहे काय तरी?

त्या तीरावर खरच आहे का सगळं सुंदर, स्वच्छं, मोठं , नयन-रम्य आणि मनोहर,
निसर्ग सौंदर्य, शिस्त-प्रिय माणसं, खूप श्रीमंती ज्यानी दिपून जाते नजर?

असे का भासते मला कि सागराचे हे दोन किनारे खूप आहेत विसंगत,
का बरं  समुद्राच्या पाण्यातल्या मीठाप्रमाणे ते एकमेकात नाही मिसळत?

त्या दोन किनाऱ्यांना वेगळा ठेवणारा मोठा प्रशांत असा तो जल समूह,
दोन्ही तीरावरील लोकं मात्र जणू तोडू पाहत आहेत आपलंच एक चक्रव्युह!

खुपदा वाटतं - नावाड्या - तुझ्या त्या होडीत बसावं ,
एकदा ह्या तीरी, एकदा त्या तीरी, दोन्ही कडे घर थाटाव. 

नावाड्या मात्र सांगतो मला:
बाई असा विचारही नका करू,
होडी तुम्हाला लागते, हे नका विसरू!

प्रत्येक तीरावरची आपलीच एक गोष्टं , आपलीच एक मजा, आणि आपलीच दुखं
कुठेही राहिलात तरी प्ररभ्द टाळणे कुणाला आजवर झालाय शक्य?

मला विचाराल तर - ज्याला त्याचा किनारा सापडला तोच खरा भाग्यवंत
रोज त्याला मिळती ओळखीचीच माणसं , आणि एक सवयीचा आसमंत !! 

No comments: